आज आपला देश जगातील सर्वात मोठ्या संख्येने तरुणवर्ग
असलेला देश आहे, परंतु जर आपण दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट आरोग्य सुविधा, रोजगार, विकासाच्या
संधी, कौशल्य वाढविण्यासाठी योजना आणि योग्य वातावरण निर्माण केले तरच ही युवा शक्ती
योग्य दिशेने वाटचाल करेल आणि देशाचा विकास होईल, अन्यथा ही शक्ती देशासाठी अडचणीचे
कारण बनेल. लोकसंख्येची वेगवान वाढ ही भारतातील निम्न जीवनमानास जबाबदार आहे. जीवनावश्यक
वस्तू व सुविधादेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. देशातील लोकसंख्या दरवर्षी सुमारे
1.60 कोटी वाढते, त्यासाठी लाखो टन धान्य, 1.9 लाख मीटर कापड, 2.6 लाख घरे आणि 52 लाख
अतिरिक्त रोजगार आवश्यक असतात. सोबतच गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक आणि मानवनिर्मित
संसाधनांवर प्रचंड दबाव असतो. ज्या देशात भली मोठी लोकसंख्या दिवसाला 2 डॉलरपेक्षा
कमीत आयुष्य जगते, तेथील वाढती लोकसंख्या केवळ अन्नसुरक्षेची परिस्थिती आणखीच बिगडवू
शकते. कुपोषणाचे मुख्य कारण म्हणजे गरीबी आणि देशातील दारिद्र्य निर्मूलन आतातरी फार
दूर आहे. यावर्षीच्या "जागतिक लोकसंख्या दिन" ची थीम हक्क आणि पर्याय उत्तरे
आहेत : मग ती बेबी बूम असो वा बस्ट, प्रजनन दरात बदलाचे समाधान सर्व लोकांच्या प्रजनन
आरोग्यास आणि अधिकाराला प्राधान्य देणे आहे.
भारताची सद्यस्थिती :- संयुक्त राष्ट्रच्या, आर्थिक आणि सामाजिक कार्य
विभाग अंतर्गत, लोकसंख्या विभाग यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 1 जुलै 2021 पर्यंत
भारताची सद्य लोकसंख्या 1,393,494,216 आहे, जे युनायटेड नेशन्सच्या ताज्या आकडेवारी
वर्ल्डमीटरच्या तपशीलावर आधारित आहे. भारताची लोकसंख्या जगातील एकूण लोकसंख्येच्या
17.7 टक्के आहे, परंतु जगातील ताज्या जल संसाधनांपैकी केवळ 4 टक्के आहे. लोकसंख्येच्या
आधारावर भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे पण लवकरच पहिल्या क्रमांकावर येईल. एकूण
भू-क्षेत्र 2,973,190 चौ. किमी आहे. म्हणजेच जगातील एकूण क्षेत्रापैकी 2.4 टक्के हिस्सा
हा आपला वाटा आहे. भारतातील लोकसंख्येची घनता प्रति वर्ग किमी 464 आहे. 35% लोकसंख्या
(2020 मधील 483,098,640 लोक) शहरी आहेत, भारतातील मध्यम वय 28.4 वर्षे आहे. शहरी भारतातील
पाण्याची मागणी सुमारे 40 टक्के भूजलद्वारे पूर्ण केली जाते. परिणामी बऱ्याच शहरांमधील
भूजल पातळी वर्षाकाठी २ ते 3 मीटरच्या भयानक दराने घसरत आहे. देशातील 20 पैकी 14 प्रमुख
नद्या पाण्याची पातळी राखण्यासाठी संघर्ष करीत आहेत, नदी आता नाल्यांचे रूप धारण करीत
आहे अर्थात प्रदूषण आणि ग्लोबल वार्मिंगमुळे खराब स्थितीतून जात आहेत.
कुपोषणाची
गंभीर समस्या : - भारतात पाच
वर्षापेक्षा कमी वयाच्या (54%) मुलांची अवस्था सर्वात वाईट आहे, जे एकतर अविकसित, दुर्बल
किंवा जास्त वजन असलेले आहेत. देशात, खराब पुरवठा साखळी व्यवस्थापन पद्धतींमुळे येवढी
नासाड़ी होते जेवढी युनायटेड किंगडम वापरून घेतो. पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या
मृत्यूंपैकी 69 टक्के कुपोषणमुळे आहे. भारतातील पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या 20 टक्क्यांहून
अधिक मुले 'कुपोषण' (उंचीसाठी कमी वजन) ग्रस्त आहेत. सद्यस्थितीत भारताची 49 टक्के
जमीन दुष्काळाच्या चक्रात आहे. दुष्काळाच्या काळात, लाखो लोक मोठ्या प्रमाणात दारिद्र्य
आणि अन्न असुरक्षिततेत पडण्याचा धोका दर्शवतात. भारत कदाचित आर्थिक समृद्धीच्या मार्गावर
असू शकतो, तरीही तो मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आणि उपासमारीने ग्रस्त आहे.
देशात
अन्न सुरक्षा आणि अन्न नासाडी स्थिती : - संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी) च्या अहवाल,
संयुक्त राष्ट्रांच्या अन्नाचा अपव्यय निर्देशांकाच्या अहवालानुसार 2021 नुसार जागतिक
स्तरावर दरवर्षी सरासरी अन्नाचा अपव्यय प्रति व्यक्ती 121 किलो आहे. यापैकी घरांमध्ये
वाया गेलेल्या अन्नाचा वाटा 74 किलो आहे. अहवाल अशा वेळी देण्यात आला आहे, जेव्हा कोविड-19
मुळे सरकार आपल्या अन्नधान्याच्या सर्व योजनांवर कार्य करीत असूनही मोठी लोकसंख्या
पोट भरण्यासाठी संघर्ष करीत आहे. अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार,
2017 ते 2020 दरम्यान सरकारी गोदामांमध्ये साठा झालेला 11520 टन धान्य सडले. भारत,
जेथे सुमारे 14 टक्के लोकसंख्या (2011 च्या जनगणनेनुसार सुमारे 16.94 कोटी लोक) कुपोषित
आहेत, ते सुद्धा दरवर्षी 50 किलो शिजवलेले अन्न वाया घालवतात. डिसेंबर 2020 मध्ये झालेल्या
हंगर वॉचच्या सर्वेक्षणात असे सांगितले गेले होते की कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान 27 टक्के
लोक बऱ्याचदा उपाशी पोटी झोपायचे. ग्लोबल हंगर इंडेक्स 2020 मधील 107 देशांपैकी भारत
94 व्या क्रमांकावर आहे. जे 27.2 गुणांसह भारतातील भुकेची पातळी गंभीर दर्शवितात आणि
कमकुवत मानल्या जाणाऱ्या शेजारी देशांच्या तुलनेत मागे आहे - पाकिस्तान (88), नेपाळ
(73), बांगलादेश (45) आणि इंडोनेशिया (70). जागतिक बँकेच्या आकडेवारीचा वापर करून प्यू
रिसर्च सेन्टरने असा अंदाज लावला आहे की, भारतातल्या गरीब लोकांची संख्या (दररोज 2
डॉलर किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न) साथीच्या आजारामुळे केवळ एका वर्षात 6 कोटींवरून
13.4 कोटींवर दुप्पट वाढ झाली आहे, याचा अर्थ असा आहे की 45 वर्षांनंतर भारत “सामूहिक
गरीबांचा देश” म्हणण्याचा परिस्थितीत परत आलाय. गेल्या दोन दशकांत देशातील शेतकरी आत्महत्यांचे
प्रमाण सतत वाढत आहे. 1999 ते 2011 या काळात आर्थिकदृष्ट्या तणावग्रस्त 1.4 कोटींपेक्षा
जास्त शेतकऱ्यांनी शेती सोडून
दिली आहे.
गरीबी
स्थिती : - 'ग्लोबल मल्टी डायमेंशनल
पॉव्हर्टी इंडेक्स' 2020 मध्ये भारताने 62 रँकसह 0.123 गुण मिळवले. यामध्ये भारताचे
प्रमाण 27.91 टक्के होते आणि भारताच्या शेजारी देशांच्या यादीत : श्रीलंका - 25, नेपाल
- 65, बांग्लादेश - 58, चीन - 30, म्यांमार - 69, पाकिस्तान – 73 होते. प्रकाशित आकडेवारीनुसार,
107 विकसनशील देशांमध्ये 1.3 अब्ज लोक बहु-आयामी दारिद्र्याने त्रस्त आहेत. 2016 पर्यंत,
भारतातील 21.2% लोक पौष्टिकतेपासून वंचित राहिले. 26.2% टक्के लोकांकडे स्वयंपाकाच्या
इंधनाची कमतरता होती. 24.6 टक्के लोक स्वच्छतेपासून वंचित होते तर 6.2 टक्के लोक पिण्याच्या
पाण्यापासून वंचित होते. 8.6 टक्के लोक विजेअभावी राहत होते आणि 23.6 टक्के लोक घराच्या
कमतरतेत राहत होते.
देशात
डॉक्टरांची संख्या : - आर्थिक
सर्वेक्षण 2019-20 ने डॉक्टरांची कमतरता दर्शविणाऱ्या वैद्यकीय पायाभूत सुविधांविषयी
माहिती दिली आहे की, डॉक्टरांची संख्या-लोकसंख्या प्रमाण 1:1456 आहे, जेव्हा की डब्ल्यूएचओ
1:1000 ची शिफारस करतो. एमसीआयच्या म्हणण्यानुसार, 2017 मध्ये अट्रॅशनचा विचार केल्यावर
हे 1.33 अब्ज लोकसंख्या अनुपात प्रमाणे डॉक्टर आणि लोकसंख्या प्रमाण 0.77:1,000 देते.
बेरोजगारीचा
वाढता दर चिंताजनक : - सीएमआयईच्या
मते, भारतातील बेरोजगारीचे दर एप्रिल 2021 च्या 8 टक्क्यांवरून मे 2021 मध्ये वाढून
11.90 टक्क्यांवर गेले आहेत. राज्य पातळीवर हरियाणा 27.9, पुडुचेरी 47.1, राजस्थान
26.2, पश्चिम बंगाल 22.1, बिहार 10.5, गोवा 17.7, हिमाचल प्रदेश 16.3, केरळ 15.8 टक्के
संख्या दर्शवते. इतर काही संशोधन माहिती वेगळी आहे. बेरोजगारीचा परिणाम यापेक्षा कित्येक
पटीने जास्त आहे, जसे दिल्लीत 45.6, तामिळनाडू 29.1, राजस्थानमध्ये 27.6 टक्के आहे,
म्हणजेच, प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या घरात बेरोजगार लोक आहेत किंवा बऱ्याच मोठ्या संख्येने
लोकांना पात्रतेनुसार काम नाही आणि बऱ्याच उच्च शिक्षित लोकांना मजूर पेक्षा कमी पगारावर
काम करावे लागते. देशात बेरोजगारीमुळे आत्महत्या आणि गुन्हेगारीमध्ये झपाट्याने वाढ
झाली आहे, ज्यामुळे अंमली पदार्थांचे व्यसन, भेसळ, शिफारस, भ्रष्टाचार, मानसिक तणाव
आणि घरगुती कलह यासारख्या समस्या वाढत आहेत.
झोपडपट्टी,
गलिच्छ वस्ती व संबंधित समस्या : -
संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक शहरीकरण संभाव्यतेनुसार, देशात झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या
लोकांची संख्या अंदाजे 10.40 कोटी किंवा भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 9 टक्के आहे.
भारतात झोपडपट्टी असणारे 2,613 शहरे आहेत. यापैकी 57% लोकसंख्या तामिळनाडू, मध्य प्रदेश,
उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात आहे. आंध्र प्रदेश झोपडपट्टय़ाच्या लोकसंख्येमध्ये
आघाडीवर आहे आणि शहरी लोकसंख्येपैकी 36.1 टक्के झोपडपट्टीत राहतात. 35 टक्के झोपडपट्टी
कुटुंबांना उपचारित नळाच्या पाण्याचा प्रवेश नाही. डीटीईने प्रकाशित केलेल्या ‘स्टेट
ऑफ इंडिया इनवायरनमेंट इन फिगर्स 2019’ नुसार, ओडिशामधील झोपडपट्ट्यांच्या मोठ्या भागामध्ये
(64.9 टक्के) उपचारित नळाचे पाणी नाही आणि ते एकतर ड्रेनेज कनेक्शनशिवाय किंवा खुल्या
नाल्याशी जोडलेले आहेत. 12 लाख (90.6 %) झोपडपट्टीतील कुटुंबे उपचार न केलेले पाणी
पितात. दर दहा झोपडपट्ट्यांपैकी सहा घरांमध्ये ड्रेनेजची योग्य व्यवस्था नाही. भारतात
63 टक्के झोपडपट्टी घरे एकतर ड्रेनेज कनेक्शनशिवाय किंवा खुल्या नाल्यांशी जोडलेली
आहेत.
सतत
संघर्षमय जीवन चक्रात वाढ : - आज
वाढलेली ही भयंकर लोकसंख्या देशातील कोरोना नियंत्रित करण्यात अडथळा ठरत आहे. प्रदूषण,
अन्न भेसळ, ग्लोबल वार्मिंग, धोकादायक ई-कचरा, प्रदूषित हवा-पाणी, सुपीक शेतीचा अभाव,
नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर, नैसर्गिक संसाधनांचा नाश, वृक्षतोड, जंगलांचा नाश, वन्यजीव
आणि मानवांमध्ये वाढणारा संघर्ष, इंधनाचा वाढता वापर, कधी दुष्काळ, कधी पूर, स्वच्छ
हवा व पाण्याची कमतरता, पर्यावरणाचा ऱ्हास, वाढती काँक्रीट जंगले, बेरोजगारी, उपासमार,
महागाई, जीवनासाठी संघर्ष आणि गंभीर आजार वाढणे, या सर्व समस्यांचे एकमेव कारण म्हणजे
वाढती लोकसंख्या आहे. अधिक लोकसंख्या म्हणजे अधिक गरजा. आजही आपल्या समाजातील अनेक
असहाय लोक, भिकारी, आजारी, विक्षिप्त लोक, असहाय्य मुले रस्त्यावर कचराकुंडीत, खराब
झालेल्या अन्नाच्या ढिगाऱ्यात पोट भरण्यासाठी अन्न निवडताना दिसतात, ही आपल्यासाठी
अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. लोकसंख्या वाढीमुळे झोपडपट्ट्या, घाणेरडे वातावरण, निरक्षरता,
दारिद्र्य, अपुरे पोषण, योग्य संगोपन अभाव, आर्थिक असमानता, यासारख्या गंभीर समस्या
आहेत. वाईट परिस्थितीत मुलांच्या जीवनाचा संघर्ष अगदी लहानपणापासूनच सुरू होतो.
वाढती लोकसंख्या ही अशी समस्या आहे जी इतर शेकडो समस्यांचे मूळ आहे. अन्न, धान्य, स्वच्छ पाणी, स्वच्छ हवेच्या कमतरतेमुळे भविष्यात पृथ्वीवरील मानवी जीवन अत्यंत कठीण आणि वेदनादायक असेल. नैसर्गिक संसाधने संपली की माणूस जगू शकणार नाही. या गंभीर समस्येबद्दल प्रत्येक नागरिकाला जागरूक असणे खूप महत्वाचे आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी कठोर निर्णय घेणे आणि कठोर कायदे करणे आवश्यक झाले आहे. जे खूप पूर्वी व्हायला हवे होते.
डॉ. प्रितम भि. गेडाम

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें
Do Leave Your Comments