रविवार, 28 जुलाई 2019

करू निसर्गाचे संवर्धन तरच निसर्ग मानवाला देईल सुखी जीवन (जागतिक निसर्ग संवर्धन दिवस विशेष- २८ जुलै २०१९) Let us conserve nature, only then will nature give humans a happy life (World Nature Conservation Day Special - 28 July 2019)

आज पावसाळ्याचा दिवसात शेतकरी शेतात पेरणी करून पावसाच्या पाण्याची वाट पाहत आहे पण पावसाचा पत्ता नाही. पावसाळ्यात सुद्धा नदी, कालव्यात, धरणात पाणी नाही आहे. शहरात पाणी टंचाई चालू आहे आणी दुसरीकडे आसाम, बिहार राज्यांमधे भयंकर पूर आले आहे. उन्हाळ्यात देशाच्या काही भागाततर 50 सेल्सीयसपर्यंत पारा वाढला होता नैसर्गिक संकटे खूप वाढत चालली आहे. असे निसर्गाचे असमतोल पणा मानवाच्या लोभामुळे व प्राकृतिक संसाधनांचा अती वापरामुळे घडून आले आहे. कोणतीही वस्तु तेव्हाच पुर्णपणे विकसीत होऊ शकते जेव्हा ती आपल्या नैसर्गीक वातावरणात असेल. आज निसर्गातील मौल्यवान वनौषधी, वने, नैसर्गीक संसाधने, जिवजंतु, वन्य प्राणि, पक्षी, नदी, डोंगर, हे सुंदर वातावरण आपले अस्तित्व संपविण्याचा मार्गावर आहे आणि याला फक्त एकच गोष्ट जबाबदार आहे तीं म्हणजे मानवाची स्वार्थ प्रवृत्ति. आज प्रत्येक राष्ट्र स्वताला विकसीत करण्याकरता धावपळ करीत आहेत. कचरा, ई-कचरा, वाढती लोकसंख्या, शहरीकरण, प्रदूषणाचे मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन, ई-संसाधनांचा जास्त वापर, बदलत चालली जीवनशैली, वाढते नवनवीन आजार, अशा कारणांने मानवाचे आयुष्य धोक्यात आले आहेत. ग्लोबल वार्मींग, तापमानात सतत बदल, दुष्काळ, पूर, डोंगरी भाग घसरणे, सुपीक मातिमधे कमतरता असे पुष्कळसे गंभीर कारण पर्यावरणातील असमतोल पणा दर्शवितात.


      आपल्या देशाची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येची गरज पुर्ण करण्याकरता फार प्रमाणात शुध्द पाणी, हवा, खाद्यांन व इतर सोयी सुवीधांची आवश्यकता असते ही सगळी वस्तु निसर्गाद्वारेच मिळते. वृक्षतोड खूप वाढली आहे, जंगल कमी होत आहेत, रानातील जनावरे मानव क्षेत्रात येत आहेत, शहरीकरण वाढल्याने शेत जमीन कमी होत आहे त्यांचे प्रभाव धान्य उत्पनावर होतो, सगळीकडे औद्योगीकरण व वाढत्या वाहनांमुळे वायु प्रदूषण वाढले आहे, पेट्रोल डिजल तेल ईधनांचा वापर खूप होतोय, मोठ-मोठे हिम खंड वितळत चालले आहेत. ग्लोबल वार्मींगची समस्या दिवसें-दिवस वाढतच आहे, ओजोन लेयरला सुद्धा धोखा वाढत आहे, शेतात रासायनिक खतांचा वापरामुळे त्याचा प्रभाव मानवी आरोग्यावर होतो, कंपन्या तून निघणारा विषारी वायु, पाणी, कचरा, जीवघेणा प्रदुषण वाढतोय, हाॅस्पीटल मधून निघणारा कचरा व इलेक्ट्रानीक कचरा खूप घातक असतो. सुखत चालली जलसंपदा, संपत चालली वनसंपदा, वायु प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, ई-कचरा हे निसर्गा साठी मुख्य समस्या आहेत. मागच्या वेळेस दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे तिथे गंभीर परीस्थिती निर्माण झाली होती तर तिथे लोकांमधे खूप आजार पसरू लागले होते तेव्हा शासना कडून   ऑड -ईवन लावण्यात आले होते. यवतमाळ जिल्हा मधे शेतात विषारी रासायनीक फवारणी करतांना सुद्धा खूप शेतकरी मृत्युमुखी पडले होते अशी गंभीर स्थिती आली आहे. निसर्गाचा सरंक्षाणासाठी कार्य करणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे या करीता शासनाद्वारे निती नियम तयार करण्यात आले आहेत. अंतराष्ट्रिय, राष्ट्रिय, राज्य, स्थानिक, एनजीओ व अनेक संगठना द्वारे निसर्गाचा सरंक्षणाकरीता कार्य केली जातात.

निसर्गाचा संगोपणात मानवाची जबाबदारी:-

  1. जर पृथ्वीवरील निसर्गाचा बिघाड थांबवून त्यात सुधारणा केली तरच मानवजाती, पशुपक्षी, जिवजंतुचे अस्तित्व टिकू शकणार आहे. त्या करीता मानवाची भूमिका मोलाची आहे. थोडीशी जागृकता व थोडीशी मदतीची गरज आहे.
  2. सर्वप्रथम वने समुद्ध व्हायला हवी म्हणजे वृक्षतोडी वर पुर्णपणे नियंत्रण करून वनीकरणावरच लक्ष्य केद्रिंत करणे म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा, वने समृद्ध करा.
  3. वने समृद्ध होतील तरच वन्य प्राण्यांना पक्षांना वनौषधींना आसरा मिळेल. वनक्षे़त्रात मानवाचे हस्तक्षेप थांबले पाहिजे. मानव सामाजिक प्राणि आहे त्यांनी आपली मर्यादा व जबाबदारी ओळखावी.
  4. लाकडी वस्तु किंवा त्या द्वारे तयार होणाऱ्या वस्तुंचा वापर शक्यतो कमीच करावा कारण होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडी केली जाते.
  5. अन्न धान्य व पाण्याचा वापर सांभाळून करावा कारण आज ही लाखो लोकं तहानलेली आणी उपाशी राहत आहेत.
  6. पर्यावरणाचा व निसर्गाचा सांभाळ करणे. संसाधनांचा, विजेचा, ईधनांचा जपून वापर व्हायला हवे.
  7. कागदाचा वापर कमी करावा कारण की कागद निर्मीती मधे खूप मोठ्या प्रमाणावर झाडे कापली जातात.
  8. स्वच्छतेचा निर्धार करणे, आधुनिक जिवनशैलीमधे बदल घडविणे.
  9. शासनाने सौर उर्जेचा वापर, रेन वाॅटर हार्वेस्टिंग करीता काही सक्त नियम व जनजागृती करायला हवी जेणेकरून प्रत्येक सर्वसामान्य वर्गापर्यंत याचा वापर सोपी होईल.
  10. येण्या-जाण्या करीता शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करावा, सायकल वापरावी व एकाच ठिकाणी जायचे असल्यास खाजगी वाहन शेयरिंग करून चालवावे.
  11. युज एंड थ्रो अशा वस्तूंना नाही म्हणा, रिसायकल होणाऱ्या वस्तुंचा वापर करावा. कचऱ्यात कमी आणावी.
  12. कोणत्याही व्यक्तीला भेटवस्तुचा स्वरूपात त्या व्यक्तीचा आवडीची रोपे द्यायला हवे.
  13. शेतात विषारी रासायनिक खतांचा वापर शक्यतो टाळावा.
  14. स्वच्छतेवर विशेष भर द्यावा, प्लॅस्टिक बंदी वर सहकार्य करावे.
  15. खुल्या वातावरणात कचरा जाळू नये. नेहमी कचरा टाकण्यासाठी कचराकुंडीचा वापर करावा.
  16. निसर्गाचा रक्षणाबद्ल जागृत होऊन दुसऱ्याना सुद्धा जागृत करायला हवे.
  17. निसर्गाचे सरंक्षण प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे तर सगळ्यां नागरिकांनी निसर्गाचा रक्षणाची शपथ घेतली पाहीजे.

प्रत्येक घटक म्हणजे हवा, माती, डोंगर, वने, जंगली प्राणि, वनौषधी, जिवजंतु, हिमशिखर, वाळवंट,  समुद्र, नदी, झाड, खनिज संसाधन हे सर्व प्रकृतीशी संबंधीत आहेत यांचा प्राकृतिक रूपाने सांभाळ करणे म्हणजेच निसर्गाचे रक्षण करणे होय. मानवाने स्वार्थी प्रवृत्ती सोडून नेहमी परोपकाराची भावना बाळगायला हवी, कारण हे निसर्ग, पर्यावरण आपले आहे आणी याला सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. समाजात कधी कुठेही वाईट बातमी आपल्याला माहिती पडली तर आपण काळजी करीत बसण्याऐवजी आपणच समाजाप्रती आपले कर्तव्य म्हणून जबाबदारी पार पाडावी म्हणजे कोणाला दोष देवून, स्वताचा मनाचे खच्चीकरण करून, मनस्ताप करून काहीही मिळत नाही तेव्हा स्वत वैयक्तीक स्तरांवर अवलंबणाचा निर्धार केल्यास खऱ्या अर्थाने हा जागतिक निसर्ग सरंक्षण दिवस साजरा करता येईल.

डाॅ. प्रितम भि. गेडाम

गुरुवार, 11 जुलाई 2019

पृथ्वी का गला घोंटती बढ़ती जनसंख्या (विश्व जनसंख्या दिवस विशेष- 11 जुलाई 2019) Growing population is choking the earth (World Population Day Special – 11 July 2019)


बढती हुई जनसंख्या पुरे विश्व के लिए गंभीर समस्या है लेकिन भारत देश के लिए तो महामारी का रूप ले रही है आज विश्व की जनसंख्या 7,716,791,619 है और भारत की जनसंख्या 1,369,100,571 है अर्थात विश्व की 17.74 प्रतिशत जनसंख्या भारत देश की है जबकी क्षेत्रफल के हिसाब से विश्व की मात्र 2.42 प्रतिशत जमीन ही हमारे देश के हिस्से मे है। आज हम चीन के बाद विश्व की दूसरी सबसे बडी जनसंख्या वाले देश के रूप मे है लेकिन अगले छह साल बाद विश्व की सबसे बडी जनसंख्या हमारे भारत देश की होगी क्योकी हमारे देश की जनसंख्या दर वृद्धि 1.02 प्रतिशत है जबकी चीन की जनसंख्या वृद्धी दर 0.43 प्रतिशत है। हमारे देश मे प्रत्येक मिनट मे 28 लोग, दिन मे 40,320 और एक महीने मे 1,209,600 इतनी जनसंख्या बढती है।

भारत देश की इतनी बडी जनसंख्या की डेंसिटी भी 460/प्रतीवर्ग किलोमीटर है जबकी बडे शहरों की स्थिती तो और भी ज्यादा बदतर है देश के प्रसिद्ध शहर मुंबई मे प्रतिवर्ग किलोमीटर/32,400 जनसंख्या डेंसिटी है। अन्य देशो की तुलना मे हमारे देश की जनसंख्या डेंसिटी काफी अधिक मात्रा मे है। चीन देश की जनसंख्या डेंसिटी 151/ प्रतिवर्ग किलोमीटर है, युनाईटेड स्टेट्स की डेंसिटी 36 है, इंडोनेशिया की जनसंख्या डेंसिटी 149 है, ब्राजील की जनसंख्या डेंसिटी 25 है, पाकिस्तान की जनसंख्या डेंसिटी 265 है, नाईजेरीया की जनसंख्या डेंसिटी 221 है, रशिया की जनसंख्या डेंसिटी 9 है एंवम मेक्सिको की जनसंख्या डेंसिटी 68/प्रतिवर्ग किलोमीटर है। आज देश की 34 प्रतिशत जनसंख्या शहरों मे रहती है साल 2050 मे 50 प्रतिशत जनसंख्या शहरी आबादी की होगी।

बढती जनसंख्या की जरूरते भी रोज तेजी से बढ रही है एंवम जब आसानी से सुख-सुवीधाए प्राप्त नही होती है तब मजबूरी मे समझौता करना पडता है। आज देश मे बेरोज़गारी, अशिक्षा, गरीबी, अपराधवृद्धी, भुखमरी, महगाॅंई, प्रदूषण, भ्रष्टाचार, मिलावटखोरी जैसी बहुत सी गंभीर समस्या है। इतनी बडी जनसंख्या की जरूरत को पूर्ण करना एक चुनौती है। बढती जनसंख्या दूसरी गंभीर समस्याओं को जन्म देती है अर्थात कई समस्याओं की मुल जड ही जनसंख्या है। एक सशक्त नागरिक बनने मे रोडा बनकर आयी हुई आफत है ये। आज खेती की उपजाऊ भूमी कांक्रीट के जंगल का रूप ले चुकी है। मानवो की आवश्यकता की पुर्ती के लिए पर्यावरण के साथ छेड़छाड़ कीया जा रहा है जिसके कारण नैसर्गीक आपदाओ मे लगातार बढ़ौतरी हुई है।

बढती जनसंख्या देश के लिए घातक :-

हंगर ऐंड मालन्यूट्रिशन रिपोर्ट के मुताबिक भारत में बच्चों के बीच कुपोषण के अनिष्ट अनुपात मिले हैं। एक दशक पहले जिन जिलों की स्थिति कुछ बेहतर थी वहां आज कुपोषित बच्चों की तादाद बढ़ी है। रिपोर्ट खुलासा करती है कि 40 फीसदी बच्चों कम वजन वाले हैं और 60 फीसदी का शारीरिक विकास थम चुका है। वहीं भारत के अधिकतर भागों में स्कूली शिक्षा की हालत दयनीय है। जहां तक उच्च शिक्षा की बात है तो उसे भी बहुत बेहतर नहीं कहा जा सकता। विश्वविद्यालयों को संसाधनों की जबर्दस्त कमी से जूझना पड़ता है। इससे उनकी गुणवत्ता प्रभावित हुई है। सयुंक्त राष्ट्र खाद्य एवं कृषि संगठन की 2017 की रिपोर्ट के अनुसार भारत में कुपोषित लोगों की संख्या 19.07 करोड़ है। यह आंकड़ा दुनिया में सर्वाधिक है। देश में 15 से 49 वर्ष की 51.4 फीसदी महिलाओं में खून की कमी है। 2016 के वैश्विक भूख सूचकांक में 118 देशों में भारत को 97वां स्थान मिला था। आज दुनिया की 7.1 अरब आबादी में 80 करोड़ यानी बारह फीसदी लोग भुखमरी के शिकार है। बीस करोड़ भुखमरी के शिकार लोगों की संख्या के साथ भारत इसमें पहले नंबर पर है। ग्लोबल हंगर इंडेक्स 2018 के अनुसार भारत 119 देशों की सूची में 103वें स्थान पर पहुंच गया है। आईएमएफ़ की रिपोर्ट के अनुसार प्रति व्यक्ति आय दर के मामले में 200 देशों की सूची में भारत 126वें पायदान पर है। ब्रिटेन स्थित चैरिटी ऑक्सफैम इंटरनेशनल ने आर्थिक असमानता को कम करने के प्रतिबद्धता सूचकांक में 157 देशों वाली सूची में भारत को 147वां स्थान दिया है।

डाॅ. प्रितम भि. गेडाम 

लोकसंख्येचा विस्फोट: गंभीर चिंतेची बाब (जागतिक लोकसंख्या दिवस विशेष- ११ जुलै २०१९) Population Explosion: A Matter of Serious Concern (World Population Day Special - 11 July 2019)


आज आपण दूषित वातावरणात जगायला लाचार आहोत. दररोज मानवाच्या गरजा वाढतच चालल्या आहेत. लोकसंख्या वाढत आहे पण त्या मानाने आपल्याकडे संसाधने व सुविधा खूप कमी आहेत. लोकसंख्येचा दूष्परीणामाच्या रूपाने सगळीकडे प्रदूषण, अन्न-धान्यात भेसळ, वाढते गंभीर आजार, ग्लोबल वार्मीग, अशुद्ध हवा-पाणी, महागाई, कमी होत चालली शेत जमीन, संपत चालली वनसंपदा, जंगले, वन्य प्राणी व मानवात वाढते संघर्ष, नैसर्गीक संसाधनांचा अती वापर, संपत चालली नैसर्गीक संसाधने ईंधन, वाढते कांक्रीटचे जंगल, बेकारी, उपासमार, जीवन जगण्याचा संघर्ष व इतर समस्यांचे कारण फक्त एक आहे ते म्हणजे वाढती लोकसंख्या. वाढत्या लोकसंख्येचा भल्या मोठ्या गरजांना पुर्ण करण्याचा नादात गुणवत्तेसोबत समझोता करावा लागतो.

आज साधारणपणे सर्वच देश वाढत्या लाकसंख्येचा समस्येने ग्रस्त आहेत. पण आपल्या देशात ही समस्या गंभीर स्थितीत आहे कारण जगाच्या 17.74 टक्के लोकसंख्या आपल्याकडे फक्त 2.4 जागेचा क्षेत्रफळात वास्तव्य करीत आहे व पुढील पाच वर्षानंतर जगाचा लोकसंख्येत प्रथम क्रमांकावर भारत देश असणार. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची गरज कशी पुर्ण होणार? जेव्हा गरजांना सहज पुर्ण करने शक्य होत नाही तेव्हा त्या गरजा नवीन समस्यांना निर्माण करतात.

ग्लोबल हंगर इंडेक्स 2018 प्रमाणे भूक आणी कुपोषणाच्या बाबतीत भारत देश 119 देशाच्या सूचीतून 103 क्रमांकावर आला आहे म्हणजे चिन, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका देशापेक्षाही जास्त वाईट परीश्थितीत आपले देश आढळून येतोय आणी ही खूपच गंभीर बाब आहे. वर्ष 2000 मधे देशात 18.2 टक्के भाग हा कुपोषित होता आणी आता 2018 मधे देशाचा लोकसंख्येतील 14.8 टक्के वर्ग कुपोषणाचा समस्येत अळखलाय. आईएमएफच्या रिपोर्ट प्रमाणे देशात प्रती व्यक्ती आय दर च्या 200 देशात भारत देश 126व्या क्रमांकावर आला आहे. देशात श्रीमंत व गरीब यातील अंतर खूप वाढत चालले आहे. ब्रिटनच्या चैरिटी ऑक्सफॅम इंटरनेशनलच्या रिपोर्ट प्रमाणे आर्थिक असमतेत कमी करण्याचा क्रमवारीत 157 देशाच्या सूची मधे भारताला 147 वा नंबर दिला आहे.

देशाच्या कित्येक भागात दरिद्रीची परीस्थिती खूप नाजूक आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यत लोकांना भुकेने जीव गमवावा लागतोय. लहान मुलांना पौष्टिक अन्न मिळत नाही. आपल्या समाजात कित्येक बेवारस मुले, भिकारी कचऱ्याचा ढिगाऱ्यातून खराब अन्न खातांनी आढळतात. बेकारीच्या समस्ये मुळे आत्महत्या व गुन्हेगारीत खूप वाढ होत आहे. गलीच्छ वस्त्या, अशिक्षा, गरीबी, आर्थिक असमता, अशा गंभीर समस्या लोकसंख्या वाढी मुळे उद्भवतात.

जगात वाढत्या लोकसंख्ये विषयी काही आश्चर्यकारक आकडेवारी

  1. आज जागतिक लोकसंख्या दिवसा पर्यंतची एकूण लोकसंख्या 7,716,791,619 इतकी झाली आहे. यात आशिया खंडाची लोकसंख्या 4,584,807,072 ऐवढी असून अफ्रिका खंडाची 1,320,038,716 लोकसंख्या आहे.
  2. आपल्या पृथ्वीवर दर 0.38 सेकंदाला एक, दर मिनिटाला साधारणपणे 155 लोकांची लोकसंख्येत वाढ होते व एका दिवसाला 2.25 लाख लोकसंख्या वाढते.
  3. मागील 12 वर्षात 1 अब्जाहून जास्त मुलांचा जन्म झाला. ह्या वर्षी 2019 ला आजपर्यंत 4.25 कोटी ऐवढी लोकसंख्या वाढली आहे.
  4. जगात लोकसंख्या वर्ष 1804 मधे 1 अब्ज होती नंतर 1930 मधे 2 अब्ज, 1960 मधे 3 अब्ज, 1974 मधे 4 अब्ज, 1987 ला 5 अब्ज, 1999 मधे 6 अब्ज, 2011 मधे 7 अब्ज, 2023 मधे 8 अब्ज, 2037 ला 9 अब्ज, 2055 पर्यंत जगात 10 अब्ज इतकी लोकसंख्या होईल.
  5. मागील 40 वर्ष अर्थात 1959-1999 मधे लोकसंख्या दुप्पट झाली म्हणजे 3 अब्जाहून 6 अब्जावर गेली.
  6. साधारणपणे दरवर्षी 1.10 टक्के प्रमाणे लोकसंख्येत वाढ होते. (1.07 टक्के दर वाढ 2019 ला, दर वाढ 1.09 टक्के 2018 ला ह्या वर्षी, 1.12 टक्के 2017ला, 1.14 टक्के 2016 मधे होती) साधारणपणे दर वर्षी 8 कोटी 30 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या वाढते.
  7. जगातील लोकसंख्येचा एक तृतियांश भाग हा आशिया खंडातील आहे. गरीबी, उपासमार व आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्या जास्त असली तरीही लोकसंख्या खूपच वाढत आहे.
  8. जगात सर्वात मोठी लोकसंख्या ही 31.5 टक्के ख्रिश्चन समुदायाची आहे व दुसऱ्या क्रमांकावर 23.2 टक्के मुस्लीम समाज येतो. हिंदू समुदाय 15 टक्के आहे व 7 टक्के आकडेवारी ही बुद्धीस्ट समाजाची आहे.

भारत देशात वाढत्या लोकसंख्ये विषयी काही आश्चर्यकारक आकडेवारीः-

  1. एका मिनिटाला आपल्या देशात साधारणपणे 28 लोकांची लोकसंख्या वाढते व एक दिवसाला 40,320 लोकसंख्या आणि महिन्याला साधारणपणे 1,209,600 इतकी लोकसंख्या वाढते.
  2. लोकसंख्येचा बाबतीत भारत देश चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2025 पासून भारत देश लोकसंख्येचा बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर असणार कारण आपल्या देशात लोकसंख्या दर वाढ 1.02 टक्के आहे जेव्हाकी चीनचा दर वाढ 0.43 टक्के इतका आहे.
  3. जगातील 17.74 टक्के लोकसंख्या ही एकट्या भारत देशातील आहे जेव्हा की भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळातील फक्त 2.42 टक्के आहे. ही खूपच गंभीर बाब आहे.
  4. आज भारत देशाची लोकसंख्या 1,369,100,571 इतकी आहे. जगातील मोठ्या लोकसंख्येसाठी प्रसिद्ध शहरातून मुंबई हे एक शहर आहे इथल्या 1 वर्ग किलोमीटर मधे 32,400 लोकं राहतात याला लोकसंख्या डेंसिटी ही म्हणतात. जेव्हाकी देशात ही 460 लोकसंख्या/प्रती वर्ग किलोमीटर डेंसिटी आहे आणी ही प्रती वर्ग किलोमीटर डेंसिटीची आकडेवारी वेळे प्रमाणे वाढतच जाणार. चीन देशाची लोकसंख्या डेंसिटी 151 आहे.
  5. देशात 34 टक्केवारी ही शहरी लोकसंख्येची आहे आणी वर्ष 2050 पर्यंत 50 टक्के लोकसंख्या ही शहरी भागातील असणार सोबत लोकसंख्या डेंसिटी 558/प्रती वर्ग किलोमीटर होणार.
  6. युथ इन इंडिया, 2017 च्या रिपोर्ट प्रमाणे 1971 ते 2011 वर्षा मधे युवांची वाढ 16.8 कोटीहून वाढून 42.2 कोटी झाली आहे. म्हणजेच पुर्ण लोकसंख्येची 34.8 टक्केवारी युवांची. 2030 पर्यंत ही वाढ 32.6 टक्के होणार अर्थातच चीनच्या युवांची 22.31 टक्के पेक्षा 10 टक्क्यांनी जास्त होईल.

वाढती लोकसंख्या एक अशी अडचण आहे जी शेकडो अन्य अडचणीचे मुळ आहे. मानवाच्या आकडेवारीच्या मानाने संसाधने कमी आहेत. भविष्यात पृथ्वीवर मानवाचे जीवन कठीन होणार कारण अन्न-धान्य, शुद्ध जल शुद्ध वायु, नैसर्गीक संसाधने संपल्यावर मानव जगू शकणारं नाही. लोकसंख्येचा भस्मासूराला जर आटोक्यात आणलं तरच पृथ्वीवरील जीवन सुंदर होईल आणी पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व टिकेल.

डाॅ. प्रितम भि. गेडाम 

सोमवार, 1 जुलाई 2019

झाडे: मानवी जीवनाचा मुख्य आधार (राष्ट्रीय वन महोत्सव आठवडा १-७ जुलै २०१९) Trees: Mainstay of human life (National Forest Festival Week 1-7 July 2019)


पृथ्वीवर जीवन टिकवणे मानवाच्या हातात आहे म्हणजे पर्यावरणाचे सरंक्षण व संगोपन करने महत्वाचे आहे आणी हे संपुर्ण पर्यावरण झाडांवर अवलंबून आहे अर्थात झाडे असतील तरच मानव असणार. मग मानव इतका स्वार्थी कसा असू शकतो की स्वताचा शिल्लक फायद्यासाठी तो जीव-जंतू, पशुपक्षी, वन्य प्राणी, व मानवाचा जीवाशी खेळतो. माणुस म्हणून घ्यायची लाज वाटायला हवी जर त्या माणसात माणुसकीच नसेल तर. मानवाचा अती हस्तक्षेपामुळेच वन्य-प्राणी व पशुपक्षांचे अस्तीत्व संपण्याचा वाटेवर आहे. आज जगात 90टक्के लोकांना शुद्ध प्राणवायू मिळत नाही आहे. शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध नाही आहे. ईंधनाचा, इलेक्ट्रॉनिक संसाधनांचा अती वापर होत आहे. गांव-खेडी आपली ओळख संपवत चालली आहेत. जंगलाचे क्षेत्रफळ कमी होऊन नवीन काॅंक्रीटचे जंगल तयार होत आहेत. अन्न-धान्य खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टिंत भेसळच-भेसळ आढळून येतेय. आज समाजात नवनवीन गंभीर आजाराने घर केलेय. अशा परीस्थिती जीवनाचे अस्तीत्व कशे टिकून राहणार. पुढच्या पीढी करीता जीवन तर कठीणच असणार. ह्या संपुर्ण समस्येवर एकच उपाय आहे ते म्हणजे वनीकरण, झाडे लावा- जीवन जगवा.  

देशात दरवर्षी जुलाई महिन्याचा प्रथम आठवडा 1-7 तारखेला वन महोत्सव म्हणून साजरा केला जातो. वन महोत्सवाचे मुख्य उद्देश्य म्हणजे सगळीकडे झाडे लावावे आणि झाडांचे कमी होत चालले क्षेत्रफळाला वाचविणे आहे. वन महोत्सवाला लाखोंच्या संख्येने झाडे लावली जातात पण दुर्देवाने त्यातील काहीच टक्के झाडं जगतात कारण की त्या झाडांची योग्य काळजी घेतलीच जात नाही. आज देशाच्या तापमानात भयंकर वाढ झालेली दिसते. प्रदूषणात वाढ, अवेळी पाउस, वादळ, उजळत चालली शेती, घसरत चालली पाण्याची पातळी, कमी होत चालले वन्य-प्राणी, औषधी युक्त वनस्पती, शुद्ध पाणी व प्राणवायुची कमतरता, वाढतं चालले नवनवीन आजार ह्या सर्व समस्या झाडांच्या कमतरते मुळेच झाले आहे.

      देशात जेवढ्या वेगाने औद्योगीकरण झाले आहे तेवढ्याच वेगाने वृक्षतोड सुद्धा झाली आहे पण मानवाने त्यामानाने वृक्षारोपन केले नाही आहे. वन नीति 1988 ज्याप्रमाणे धरणी च्या पुर्ण क्षेत्रफळातून 33टक्के भागात वने असायला हवे तेव्हाच निसर्गाचे संतुलन कायम राहू शकेल. पण वर्ष 2001 च्या रिपोर्ट मधे अशी माहिती समोर आली ज्यावरून लक्षात आले की देशात फक्त 20टक्केच वने उरली आहे.

भारतीय वन सर्वेक्षण 2017 च्या रिपोर्ट प्रमाणे

दर दोन वर्षांनी केद्रिंय शासनातर्फे वन सर्वेक्षण विभाग आपली रिपोर्ट सादर करते. केंद्रिय पर्यावरण, वन आणी जलवायु परिवर्तन मंत्रालय द्वारे 12 फेब्रुवारी 2018 रोजी भारत वन स्थिती रिपोर्ट -2017 सादर करण्यात आली. ह्या रिपोर्ट प्रमाणे आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरल मधील वनक्षेत्रात वाढ झाली आहे. वन क्षेत्रांच्या बाबतीत भारत जगातिल उच्च 10 देशांमधे येतो. भारताचा भूमी वरील 24.4 टक्के भाग झाडांनी घेरले आहे पण हे जगाच्या संपुर्ण भू-भागाचा फक्त 2.4 टक्के इतकाच आहे. जेव्हाकी बाकीच्या 9 देशाचा लोकसंख्या घनत्व 150लोकं/वर्ग किलोमीटर आहे आणी भारतात 382 लोकं/वर्ग किलोमीटर आहे व यावर 17 टक्के मानवी लोकसंख्या व 18 टक्के पशुसंख्यांची गरज पुर्ण करण्याची जबाबदारी आहे.

वृक्ष तोडीची कारणे

­  सर्वात मुख्य कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आहे. ज्याप्रकारे प्रचंड वेगाने लोकसंख्या वाढत आहे त्यामानाने लोकांचा गरजा सुद्धा वाढते म्हणून लोकांचा खाण्यापिण्याचा, राहण्याचा, कामाचा गरजा भागविण्या करीता झाडे कापली जातात.

  1. आलिशान घर, फर्निचर, खिडक्या, दारं, सजावटी वस्तु, इतर गोष्टिंत लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर.
  2. मौल्यवान व औषधीयुक्त झाडांपासून होणारे फायदे असल्या कारणाने असे झाड स्वार्थापोटी कापली जातात.
  3. मोठ्या प्रमाणात अवैध उद्योग धंद्याना लाकडांची गरज.
  4. मानवी भोग विलासतेच्या वस्तु करीता.
  5. व्यवसायाचा कच्चा माल करीता.
  6. विकास, उद्योग, नवीन योजना आखण्याचा नावाखाली मोठ्या संख्येने झाडे कापली जातात.

झाडांचे फायदे

  1. वनांमुळे पृथ्वीवर निसर्गाचा योग्य सांभाळ होतो.
  2. झाडांची मुळं मातीला धरून ठेवतात त्यामुळे जमीनीचे क्षरण होत नाही व पावसाचे पाणी जमीनीत मुरते.
  3. झाडांद्वारे शुद्ध प्राणवायू मिळते जे प्रत्येक जीवांसाठी गरजेचे आहे.
  4. झाडे कार्बनडाय ऑक्साइड सारखी विषारी वायु अवशोषित करतात व प्रदूषणावर नियत्रंण ठेवतात.
  5. झाडांद्वारे औषधी व चंदन सारखे मौल्यवान लाकूड मिळतो. पशुपक्षींना राहायला घर मिळते.
  6. ग्लोबल वार्मींगची समस्येला दूर करण्यास मदत होते

झाडांमुळे वने समृद्ध होतात, वनामुळे जंगल समृद्ध होतात, वन्य-प्राणी, जीव-जंतू समृद्ध होतात, निसर्गाचा समतोल राहतो, वातावरण स्वास्थदायक होते, जमीनीत पाण्याची पातळी वाढते, शुद्ध प्राणवायू शुद्ध जल मिळते, पाण्याचे स्त्रोत वाढतात,  गांव समृद्ध होतात, चांगली शेती पिकायला मदत होते, अन्न-धान्य वाढते, महागाई कमी होण्यास मदत होते, नैसर्गीक आपदा कमी होण्यास मदत होते. मानवाचा विकास होतो. तर चला आपण माणुसकी च्या नात्याने सर्व एक प्रण घेऊ की जास्तच जास्त झाडे लावू, झाडे जगवू, पर्यावरणाचे रक्षण करू, परीवाराचा सदस्या प्रमाणे झाडांचे सांभाळ करू आणी आपली ही सुंदर धरणी वनांने समृद्ध करू.

डाॅ. प्रितम भि. गेडाम