कोणाच्या
हक्काचे, कष्टाचे, कर्तृत्वाचे यश आपल्या पदरात खेचणे, आपल्या पदाचा सत्तेचा अधिकारांचा
दुरुपयोग अर्थातच हा गंभीर गुन्हा आणि अशा गुन्हेचे परीणाम कित्येकदा सामान्य जनतेला
स्वताचा जीव सुद्धा गमावून भोगावे लागते. लाचलुचपत सारख्या गंभीर समस्ये मुळे शासनाला
दरवर्षी अब्ज डाॅलरचा तोटा होतो. भ्रष्टाचार समाजातील मुख्य समस्या आहे जी इतर समस्येची
जन्मदाती आहे. माणसातील स्वार्थी पणा इतका जास्त वाढला आहे की तो स्वता व्यतीरीक्त कोणाचा
विचारच करीत नाही आणी हे सुद्धा समजत नाही की आपल्या छोट्याशा फायद्यासाठी समाजाला
किती मोठा धोखा पत्करावा लागतो. भ्रष्टाचारामुळे समाजातील श्रीमंत-दारिद्र यांचा तील
अंतर हे वाढतच चालले आहे. गरीब आणखी गरीब व श्रीमंत आणखी श्रीमंत होत चालले आहेत. जगात
क्वचीतच कोणी व्यक्ती असा असेल ज्यानी आपल्या आयुष्यात भ्रष्टाचाराला बळी पडला नसेल.
भ्रष्टाचार म्हणजे लाचलुचपतपणा अर्थात की जेव्हा कधी कोणी व्यक्ती कायद्याचा विरूद्ध जावून आपल्या स्वार्थापोटी वाईट मार्गाचे आचरण करतो तेव्हा त्याला भ्रष्टाचार म्हणतात. भ्रष्टाचार समाजातील खुपच गंभीर समस्या आहे. ही समस्या पुर्ण समाजाला पोकळ करीत आहे. प्रत्येक क्षेत्र कमी-जास्त प्रमाणात भ्रष्टाचारामधे गुंतून आहे असे आढळून येते. समाजात प्रत्येकजण कोणत्यानीं कोणत्या रूपात या समस्ये मुळे ग्रस्त आहे. आजकाल आपण वर्तमानपत्रे, न्यूजचैनल, सोशल मिडीया व इतर मार्गाने भ्रष्टाचार बद्दल नवनवीन घोटाळे एकतो, वाचतो. भ्रष्टाचार हे गुणवत्ता पुर्ण शिक्षण, संस्कार, कायदा, प्रामाणिकपणा, निती नियम, कर्तव्य, निस्वार्थ सेवाभाव, अशा गोष्टींना संपवत आहे.
जगातील सर्वात मोठ्या लोक तांत्रीक देशातील युवा पीढी भ्रष्टाचाराला बळी पडत आहे. देशात पुर्वी पासुनच बैंकींग घोटाळे, सुशिक्षीत बेरोजगारी, गरीबी, अशिक्षा, जातीवाद, आतंकवाद, नक्षलवाद, शेतकरी आत्महत्या, प्रदूषण, भेसळखोरी, जमाखोरी, नोकरी व्यवसायाचा नावाखाली आर्थिक व्यवहार, खाण्यापीण्याचा वस्तुत जीवघेणे केमिकलचा वापर अशा सारख्या गंभीर समस्या आहेत आणी भ्रष्टाचार अशाच समस्यांना वाढविण्यात मदत करते. जेव्हा पर्यंत अशा समस्यांना संपवणार नाही तो पर्यंत समाजातील सर्वांगीण विकास शक्यच नाही. संपुर्ण जगात ही समस्या पसरली आहे. या भ्रष्टाचाराच्या समस्यात पुर्ण समाज भागीदार आहे कारण लाच घेणे व लाच देणे यात दोघे ही बरोबरीचे आरोपी आहेत. सोबतच अन्यायाला शांतपणे सहन करणारा व्यक्तीही तेवढाच दोषी असतो. प्रत्येक कामात पारदर्शता आणणे खूप गरजेचे आहे. मागील काही वर्षात 15 पत्रकारांना मारण्यात आले जे भ्रष्ट्राचारा विरूद्ध काम करीत होते. इतर देशांपेक्षा भारतात पत्रकारांवर जास्त हल्ले करण्यात येतात असे कळून आले. महाराष्ट्र राज्यात मागील काही वर्षात पुष्कळ आरटीआई कार्यकत्यांची हत्या करण्यात आली आहे. काही सामाजीक कार्यकत्यांना अन्याय विरूद्ध बंड पुकारल्यामुळे स्वताचा जीव सुद्धा गमवावा लागला. आंतरराष्ट्रिय एनजीओ ”काॅमनवेल्थ हृयूमन राईट्स इनिशिएटिव“ च्या रिपोर्ट प्रमाणे मागच्या काही वर्षात महाराष्ट्रातील 60 पेक्षा जास्त आरटीआई कार्यकत्यांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. इतर राज्यापेक्षा ही आकडेवारी जास्त आहे, ह्या आकडेवारी वरून असे समझून येते की महाराष्ट्रात भ्रष्टाचार विरूद्ध काम करणारी व्यक्तीवर जास्त घटना घडून आले आहेत.
शिक्षणाचे होत चालले बाजारीकरण
आजकाल समाजात सगळीकडे शिक्षण संस्थानांचा जणू काही पुरच आला आहे असे जाणवते तरीही जागतीक स्तरावर भारताची शैक्षणिक गुणवत्तेची स्थिती संतोष कारक नाही. महागलेली शिक्षण प्रणाली मुळे पालकांवर दबाव दिसुन येतो व सातत्याने शिक्षण संस्थानात असलेली प्रतिस्पर्धा ही वाढतच चालली आहे. आजच्या वातावरणात व्यावसायीक व उच्च शिक्षण घेणे सामान्य माणसाला परवडण्यासारखे राहिले नाही. लहान मुलांचा नर्सरी ते उच्च शिक्षणा पर्यंत पालकांकडून मोठे शुल्क आकारण्यात येते सोबतच महागड्या खाजगी कोचिंग क्लासेस सुद्धा जिकडे-तिकडे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शाळा महाविद्यालयांमधे नोकरभर्तीचा नावाखाली लाखो रुपयांची देवाण-घेवाण होते हे तर आपण नेहमी ऐकतच असतो मग ज्या शिक्षण विभागात लाखो कोटींचा भ्रष्टाचार करून शिक्षक नोकरीवर येतात ते कर्मचारी समाजापुढे काय आदर्श ठेवतील आणी विद्याथ्र्यांचे कशे भविष्य घडवतील हे तर देवच जाणे.
भारतात भ्रष्टाचार विरूद्ध कायदे
- भारतीय दंड संहिता 1860
- भ्रष्टाचार निवारण अधिनियम 1988
- बेनामी देवघेव निषेध अधिनियम
- अर्थशोधन निवारण अधिनियम 2002
- आयकर अधिनियम 1961ची अभीयोग धारा
- भ्रष्टाचार निवारण संशोधक कायदा 2018
भ्रष्टाचाराच्या नियंत्रणाकरीता काही उपाय योजना
- जर आपल्याला देश भ्रष्टाचार मुक्त करायचे आहे तर पहीले देशात प्रामाणीक लोकांचा समाज घडवावा लागेल. चांगल्या विचार शक्तीची माणसे, आई-वडील, गुणवत्ता पुर्ण शिक्षकांचा द्वारे दिलेल्या शिक्षा संस्कारामुळेच हे शक्य होईल म्हणून मुलांना लहानपणा पासूनच सत्य, न्याय, प्रामाणीकपणाची शिक्षा मिळायलाच हवी.
- आपल्या डोळ्या देखत पुष्कळदा भ्रष्टाचारासंबंधी कामे घडत असतात पण आपण त्या गोष्टीला गंभीरपणे घेत नाही जेव्हा की आपण सुद्धा त्याला बळी पडतो ह्या संबंधी सर्व नागरीकांमधे जागृकता येणे खूप गरजेचे आहे.
- कायद्याच्या अवघड गोष्टींना सोप्या भाषेत दर्शवायला हवे जेणेकरून सामान्य माणसाला स्वताच्या कर्तव्य व अधिकारांची जाणीव होईल. भ्रष्टाचारावर पुर्णपणे आळा घालण्यासाठी सुरूवाती मधे आपल्याला थोडा-फार त्रास होवू शकतो पण देशाचा किंवा समाजाचा विचार केला तर लक्षात येईल की देशापुढे आपले स्वार्थ काहीही नाही कारण समाज सर्वोपरी आहे, समाजाचा विकास आपला विकास आहे आणि आपल्याला इतरांचे अधिकार हिरावून घेण्याचे काही अधिकार नाही.
- शासकीय अधिकारी वर्ग ज्या पदावर कार्यरत असतो त्या पदाची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी त्या अधिकारीची असते तेव्हा कार्य करतांना कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये व न्याय संगत कार्यच निरंतर करायला हवे कारण शासकीय कर्मचारीची एक छोटीशी चुक सुद्धा अनेकांचे अमुल्य जीवन उध्वस्त करते.
- शासकीय कामात पारदर्शता आणायला हवी ज्यामुळे जनतेला शासनाचा कामाची पुर्ण माहिती मिळेल व यात प्रसार माध्यमांनी नेहमी निष्पक्ष, निर्भय व खंबीरपणे काम करायला हवे.
- लाच घेण्या-देण्या वर कडक कायदा व्यवस्था असलीच पाहीजे तेव्हाच भ्रष्ट लोकांमधे कायद्याची भिती येईल.
- न्यायालयाचे निर्णय हे लवकरात लवकर लागायला हवे.
- माणुसकी, प्रामाणिकपणा, समाजाचा प्रती आपले कर्तव्य व काही देणे लागते ही जाणीव प्रत्येकात असायला हवी.
ज्या दिवशी माणसात मी व माझा परिवाराचे हित या ठिकाणी माझा समाज व माझा देश अशी भावना निर्माण होईल तेव्हा हा देश आपोआपच भ्रष्टाचार मुक्त होउन विकासाकडे वाटचाल करेल आणी अशा देशाला जगात सर्वात विकसीत देश बनवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही.
“उठा, जागे व्हा, स्वाभिमान बाळगा! समाजातून भ्रष्टाचार नाहीसा करण्यास शपथ घ्या”.
डाॅ. प्रितम भि. गेडाम

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें
Do Leave Your Comments